March 7, 2026

कुरखेड्यातील धक्कादायक घटना: बैलजोडीचा मृत्यू, खरे कारण काय?

“पूरग्रस्त शेतकऱ्यावर संकट: बैलजोडी वाहून गेल्याने 80,000 रुपयांचे नुकसान”

कुरखेडा, २७ जुलै : तालुक्यातील मालेवाडा नजीकच्या चरवीदंड येथील शेतकरी रतीराम सखाराम हलामी (वय 42) यांच्या मालकीची बैलजोडी पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यूमुखी पडली. या घटनेने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

सविस्तर वृत्त असे की, रतीराम शेतावरून बैलजोडी घेऊन घरी परतत असताना नेवासा काटेंगे यांच्या शेताजवळील नाल्याला अचानक पूर आला. नाल्याच्या पुलावरून जाताना बैलाचा पाय घसरल्याने एक बैल पाण्यात वाहून गेला. जोडी टाकली असल्याने दुसरा बैलही पुरात वाहत गेला. गावकऱ्यांनी आरडाओरड ऐकून तातडीने मदत केली आणि बैलांना बाहेर काढले, परंतु तोपर्यंत दोन्ही बैलांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी 80,000 रुपयांना खरेदी केलेली ही बैलजोडी रतीराम यांच्यासाठी मोठी गुंतवणूक होती.

सध्या रोवणीचा हंगाम सुरू असताना या नुकसानीमुळे रतीराम यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. गावकरी प्रशासनाकडे तातडीने नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. रतीराम यांनी पशुधन विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईसाठी कुरखेडा तहसील कार्यालय किंवा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणी त्वरित कारवाई करून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!