April 25, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव: विकास विद्यालय आणि थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथेसामाजिक समता सप्ताहात विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

कुरखेडा, १४ एप्रिल : विकास विद्यालय आणि थोरवी कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, कुरखेडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवारी मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी आयोजित कार्यक्रमाने सामाजिक समता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. आर. एम. अलगदेवे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रज्ञा शील करुणा प्रसारक मंडळाचे सहसचिव मा. श्री. अनिकेत पी. आकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी थोरवी कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक मा. श्री. बी. डी. सहरे, श्री. पुस्तोडे, श्री. कोडाप, श्री. लांजेवार, श्री. कुथे, सायली मॅडम, कावळे मॅडम, काशीवार मॅडम यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, ज्यांनी कार्यक्रमाला शोभा आणली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करण्यासाठीएप्रिल ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि विचारशक्तीला चालना देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या मध्ये निबंध लेखन, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धां मध्ये इयत्ता 5 वी ते 9 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आपल्या प्रतिभेचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला.

निबंध लेखन स्पर्धेत इयत्ता 9 वीच्या नियती सहाळा हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर थोरवी कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता 11 वीच्या उज्वला मडावी हिने देखील प्रथम बक्षीस मिळवले. वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता 9 वीचा निशांत काटेंगे आणि इयत्ता 11 वीची उज्वला मडावी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर इयत्ता 5 वीच्या रामेश्वरी तितराम हिने द्वितीय बक्षीस प्राप्तकेले. चित्रकला स्पर्धेत मयूर याने प्रथम आणि राधेश्याम फुलकुवर याने द्वितीय बक्षीस मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांनी सत्कार करून त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. अनिकेत पी. आकरे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले, “माणसाला यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण आणि सामाजिक समतेचा मार्ग दाखवला. तुम्हीही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वप्नांचा पाठलाग करा.” त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जेचा संचार केला. तसेच, त्यांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वासाचे महत्त्वही अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सोनकुकरा सर यांनी अतिशय प्रभावीपणे केले

About The Author

You may have missed

error: Content is protected !!